एका रुपया पीकविमा भरलेले हे शेतकरी अपात्र Crop insurance at one rupee

Crop insurance at one rupee अवघा एक रुपया तर भरायचा आहे म्हणून मागील वर्षीच्या खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तब्बल चार लाख ९९ हजार २८० शेतकऱ्यांना एक दमडीही मंजूर झाली नाही. ७४ हजार शेतकऱ्यांना मंजूर ८२ कोटी रकमेसाठी देखील विमा कंपनीने वेटिंगवर ठेवले आहे.

खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा रक्कम भरताना शेतकऱ्यांनी अवघा एक रुपया भरण्याची राज्य शासनाने तरतूद केली होती. शेतकरी हिश्श्याची रक्कम राज्य सरकारने भरली होती. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला. प्रति एक रुपया याप्रमाणे शेतकऱ्यांचे ७ लाख रुपये विमा कंपनीकडे जमा झाले.

विमा कंपनीकडून नुकसानभरपाई म्हणून दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी मंजूर केले आहेत. त्यातील ८२ कोटी अद्याप ७३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत. मंजूर रकमेसाठीही शेतकऱ्यांना वेटिंगवर ठेवले आहे. एकीकडे मंजूर रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसताना तब्बल पाच लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे. म्हणजे या पाच लाख शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून एक दमडीही मिळणार नाही. Crop insurance at one rupee

संरक्षित रक्कम कशासाठी ?

विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी विमा भरल्यानंतर केंद्र व राज्य शासन त्यांचा हिस्सा विमा कंपनीकडे जमा करते. त्याच्या आधारे विमा कंपनी संरक्षित रक्कम अंतिम करते. मागील वर्षीच्या खरीप हंगामाची संरक्षित रक्कम २०८१ कोटी इतकी आहे. प्रत्येक तालुक्याची संरक्षित रक्कम कोट्यवधी असून, वेगवेगळी आहे. अशी संरक्षित रक्कम खरीप व रब्बी हंगामात असते.

तालुक्याचे नावसहभागी शेतकरीमंजूर शेतकरीमंजूर रक्कम
अक्कलकोट१००९१२३८३९७४३
बार्शी११५७५२८९९९०११४
करमाळा १०४३९७ १२६७९ ०.९
माढा १०६५०९ २२८०० १४
माळशिरस ४२३४५ १५२८ १.४१
मंगळवेढा ६३१०१ २७०३९ १४.२८
मोहोळ ३०७६ ७८५६ २२
पंढरपूर ९४०५ ९५१ २.२८
सांगोला ८७४३७३२१० ५.४८
उ. सोलापूर२३२२८ १२५१९ ३५
द. सोलापूर५४३३३ २०४४४ १८.३७
एकूण ७३८१८३ २३८९०३ २७९

(सहभागी व मंजूर शेतकरी संख्या तर मंजूर रक्कम ही कोटीमध्ये आहे)

Leave a Comment